सामाजिक

जैव विविधता जपणे ही खरी गरज – डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड. राजा राममोहन रॉय सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे प्रणेते – आनंद भैय्या गायकवाड

केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय व आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण आनंदगांव ता.केज जि. बीड येथे दिनांक २२ मे २०२६ रोजी जागतिक जैव विविधता दिन व राजा राममोहन रॉय जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथम राजा राममोहन रॉय यांच्या प्रतिमेला रावसाहेब जाधव व संभाजी लवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.त्यानंतर जैवविधिता आणि अन्न साखळी या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत दोन्ही संस्थांचे संस्थापक, जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाजसेवक,महाराष्ट्रा तील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड विचार मांडले.नदी, जंगल,समुद्र,पर्वत, वातावरण आणि पृथ्वी वरील प्रत्येक जीव हे जैवविविधता साखळी तील घटक आहे.आज हि जैवविविधतेची साखळी भौतिक सुविधेसाठी तोडली जात आहे.अगदी औद्योगिक वसाहती साठी,रस्त्यासाठी जंगले तोडली जात आहेत. यामुळे मानवी हव्यासा मुळे नैसर्गिक अन्न साखळी खंडीत होत आहे.यामुळेच वातावरण बदलला आपणाला सामोरे जावे लागत आहे. छोट्या – मोठ्या जिवजंतु लाही माणूस संपवत निघालेला आहे.पण माणसालाच कळत नाही कि,या विनाशाच्या वाटेवर आपणही संपत चाललो आहेत.

फक्त पैसा हिच संपत्ती नाही तर सगळ्यात मोठी संपत्ती निसर्ग आहे, निसर्गाला आव्हान देण्याचे काम सामान्य माणसापासून शासकीय यंत्रणा,शासन वेगवेगळया भौतिक सुविधांसाठी करीत आहे. यात आपण स्वतः संपणार आहोत याची जाण मात्र कुठेही दिसत नाही.जैवविविधता व अन्न साखळीला बाधा आणून आपण आपल्या पदरी दुः ख,निराशा व घोर संहार करत आहोत याची जाणीव माणसाला होणे गरजेचे आहे.निसर्ग चक्र निसर्गाच्या पद्धतीने चालले तरच निसर्गातील जैवविविधता राखली जाईल व अन्न साखळी सुरजीत राहील जेणे करून प्रत्येक जीवाचे जगणे सुकर होईन याची जाण होणे व सजगपणे जैवविविधता जपणे निसर्गातील अन्न साखळी जशी आहे तशी नैसर्गिक दृष्ट्या चालू देणे काळाची गरज आहे.अन्यथा जीवन जगणे मुश्कील आहे.यासाठी माणसाने काही उपाययोजना कराव्यात.

जलसाठे व जलस्तोत्र स्वच्छ ठेवणे. सेंद्रिय सेतीला चालना देणे.जंगलतोड रोखणे, मोठ्या संख्येने व मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे,पर्यावरण जन जागृती करणे, प्लास्टीकचा वापर टाळणे,तसेच वन्यजीव संरक्षण कायद्याची अमलबजावणी करणे म्हणजेय इतर जीवाचेंही रक्षण करणे महत्वाचे आहे.जैव विविधता पर्यावरणच नाही तर अर्थव्यवस्थेसाठीही महत्वाची आहे.शेती, औषध निर्मिती, पर्यटन व वन उद्योग,मत्स्य व्यवसाय व इतरही अनेक बाबींसाठी जैव विविधतेत फायदा आहे.

निसर्ग वाचवा,जैव विविधता जपा हा संदेश प्रत्येक घरात गेला पाहिजे.तसेच कचर्‍याचे वर्गीकरण करणे गरजेचे आहे.पाण्याचा काटकसरीने वापरकरणे, झाडे लावणे, प्लॅस्टिकचा वापर थांबविणे,निसर्गाचे मनातून संवर्धन करणे संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असा शास्वत विचार घराघरातून होने आवश्यक आहे,अन्यथा निसर्ग आपल्यावर आता ही थोडा बहुत कोपला आहे.

भविष्यात माणसाच्या अंगी शहाणपणा नाही आल्यास पृथ्वी मसणवठा (स्मशानभुमी) बनायला वेळ लागणार नाही.म्हणून तरी जैव विविधता जपणे आपली, काळाची गरजअसल्याचे प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले. राजा राममोहन रॉय सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे प्रणेते व भाग्यविधाते होते असे प्रतिपादन आनंद भैय्या गायकवाड यांनी व्याख्यान देताना केले.

कार्यक्रमाला संजय सोनवणे,बाळासाहेब गायकवाड यांची उपस्थिती होती.अध्यक्ष स्थानी माजी सरपंच रामराजे गायकवाड हे होते.कार्यक्रमाला वाचक, विद्यार्थी,युवक,जेष्ठ नागरीक यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!