अध्यात्मिकसामाजिक

वसुंधरा पायी दिंडी २०२५ समाजहित, पर्यावरणसंवर्धन आणि सेवाभावाचा संगम

केज/प्रतिनिधी

मराठवाड्यातील श्रीक्षेत्र माऊली माहेर,जिल्हा परभणी येथे वसलेल्या जगद्‌गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी स्थापित केलेल्या रामानंद संप्रदाय, मराठवाडा(परभणी) उपपीठाहून “वसुंधरा पायी दिंडी २०२५” चे भव्य प्रस्थान दि.२८ सप्टेंबर रोजी झाले.या दिंडीत हजारो भाविक सहभागी झाले असून ते परभणीपासून श्रीक्षेत्र नाणीजधाम (रत्नागिरी) पर्यंतशेकडो किलोमीटर चा प्रवास पायी करणार आहेत.

ही दिंडी खास आहे कारण जगद्‌गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी यांचा ५९ वा वाढदिवस दिनांक २१ ऑक्टोबर रोजी रामानंदचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून त्या दिवशीच ही दिंडी नाणीज धाम येथे दाखल होणार आहे .फक्त मराठवाड्यातूनच नव्हे तर तेलंगणा उपपीठ,  उत्तर  महाराष्ट्र (नाशिक) उपपीठ, पूर्व विदर्भ (नागपूर)उपपीठ ,मुंबई उपपीठ(वसई),पश्चिम महाराष्ट्र (पुणे) व गोवा उपपीठ या सातही उपपीठांहून ही भाविकांची पायी दिंडी निघाली आहे.या सर्व दिंड्यांना “वसुंधरा पायी दिंडी” असे नाव देण्यात आले असून पर्यावरण संवर्धन,सामाजिक ऐक्य आणि सेवाभाव हा प्रमुख संदेश यामधून दिला जात आहे.

पर्यावरणपूरक दिंडीचे वैशिष्ट्य

या दिंडीमधून सध्या अत्यंत महत्त्वाचा परंतु दुर्लक्षित विषय असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग विषयी जन जागृती केली जात आहे.हजारोभाविकांच्या मुक्कामा दरम्यान भोजन,पिण्याचे पाणी, स्वच्छता व निवासाची उत्कृष्ट सोय करूनही पर्यावरणाला कोणतीही हानी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.कचरा व्यवस्थापनासाठीस्वतंत्र सेवेकरी,टॉयलेट व्हॅन, तसेच पिण्याचे पाणी व स्वच्छतेसाठी लागणारे दोन स्वतंत्र टँकर्स या दिंडीत सोबत आहेत. दिंडीदरम्यान दररोज वृक्षारोपणही करण्यात येत आहे.

शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी दिंडी

ही दिंडी रस्त्याच्या एका बाजूने,एकाच तालात आणि एकाच रंगसंगती च्यावेशभूषेत पुढेचालत आहे.भाविकांच्या गजराने आणि शिस्त बद्धतेमुळे वातावरण भारावून जात आहे.या दिंडीचे हे सलग तिसरे वर्ष असून यंदा दोन नवीन दिंडींची भर पडल्याने हा उपक्रम अधिक व्यापक झाला आहे.

भाविकांसाठी विशेष सोयी

दिंडीतील भाविकांना वेळेवर सकस आहार दिला जात असूनसोबत संस्थानाची ऍम्ब्युलन्स व वैद्यकीय पथक सतत कार्यरत आहे.त्यामुळे युवा-युवतींपासून ते महिला-पुरुष,मध्यम वयीन आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच भाविक उत्साहाने सहभागी झाले आहेत.

समाजोपयोगी उपक्रम

जगद्‌गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून रामानंद संप्रदाय अनेक उपक्रम राबवतो.महामार्गावरील ऍम्ब्युलन्स सेवा, मरणोत्तर देहदान व अवयवदान,गरीब मुलां साठी मोफत CBSE शिक्षण,सर्व जाती पंथीयांसाठी मोफत वेदपाठशाळा,रक्तदान, व्यसनमुक्ती, आपत्कालीन मदत अशाअसंख्य सेवाभावी कार्यांमुळे संप्रदाय समाजात ओळखला जातो.

सरकारी उपक्रमाशी दिंडीची सांगड

यासोबतच नुकतीच घोषित करण्यात आलेली सरकारी योजना “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाशी दिंडीची जोड देण्यात आली आहे.सलग तिसऱ्या वर्षी सुरू असलेल्या या वसुंधरा पायी दिंडीमधून हजारो वृक्ष लागवड करण्यात येत असून पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश समाजा पर्यंत पोहोचत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!