सामाजिक

विराळमध्ये जागृत महिला सक्षमीकरण शिबिर उत्साहात संपन्न ; महिलांना उद्योजकतेचे धडे

विराळ/प्रतिनिधी

महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त विराळ येथे आयोजित करण्यात आलेले जागृत महिला सक्षमीकरण शिबिर उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाले. महिलांना स्वावलंबी आणि उद्योजक बनवण्या साठी आयोजित या शिबिरात मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला डॉ. तानाजी चंदावर,सौ. सुमिता कावळे मॅडम, सरपंच संतोष प्रभाकर पवार,ज्येष्ठ माजी चेअरमन रामराव एकलोरे,सीआरपी स्वाती तुळशीराम जाधव,माजी उपसरपंच पांडुरंग वाघमारे,शोभाताई गौतम भालेराव, आशा कार्यकर्ती शोभा शिवमुर्ती वाघमारे, रोजगार सेवक दत्ता गोविंद वाघमारे आणि समर्थ धोंडूतात्या कमिटी चे लक्ष्मण एकलोरे यांची प्रमुख उपस्थितीलाभली.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक विशाल पाटील आणि प्रमुख वक्त्या उद्योजिका सुमिता कावळे यांनी महिलांशी संवाद साधताना सांगितले की, आजच्या काळात महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता स्वतःचा व्यवसाय उभा करून आत्मनिर्भर व्हावे.आवळयापासून वीस पेक्षा अधिक वस्तू तयार करून त्याची विक्री कशा प्रकारे केली जाते याची माहिती दिली.

डॉ.तानाजी चंदावर यांनी ही महिलांना स्वावलंबनाचा संदेश देत उद्योगाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.यावेळी आदर्श शिक्षक मारुती घोटरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले,तर सरपंच संतोष पवार यांनी गावात अशा महिलासक्षमीकरण उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल अमोल भालेराव,सूरज भालेराव, आयोजकांचे अभिनंदन केले.या प्रसंगी अमोल भालेराव यांनी म्हटले की,गावातील महिलांना, तरुण पिढीला सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे.या शिबिरामध्ये महिलांना आवळ्या पासून घरच्या घरी १५ पेक्षा अधिक उत्पादने तयार करून त्यांची विक्री कशी करावी,याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला असून उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले.

या उपक्रमाचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ,श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ विराळ यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!