सामाजिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य देशासाठी महत्वाचे तर क्रांतिसिंह नाना पाटील प्रति सरकारचे प्रणेते – डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड

केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व क्रांतीसिंह नाना पाटील यांची पुण्यतिथी व्याख्यान व परिसंवाद कार्यक्रम घेवून साजरा करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते,प्राचार्य,डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.

सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूनमान्यवरांच्या हस्ते पुजन व वंदन करण्यात आले.प्रमुख व्याख्याते म्हणून एस.के. वैरागे यांचे छोटेखानी व्याख्यान झाले.त्यानंतर परिसंवाद कार्यक्रम घेण्यात आला.या परिसंवादात वामन गायकवाड,बाळासाहेब गायकवाड,रामराजे गायकवाड,अरुण गायकवाड,रमेशराव गायकवाड,ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी सहभाग घेतला.

परिसंवादात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य कर्तृत्व व क्रांतिसिंह नाना पाटलांचे कार्य कर्तृत्व यावर परिसंवाद झाला.त्यानंतर अध्यक्षीय समारोप डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला. देशाच्या जडणघडणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान होते तसेच देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मोठे योगदान होते असे प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी मोठे योगदान होते तर क्रांतिसिंह नाना पाटील पत्री सरकार व प्रति सरकारचे प्रणेते होते असे अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाला रावसाहेब जाधव,प्रकाश गायकवाड, पांडूरंग गायकवाड,ए.बी. गायकवाड,यांच्या सह युवक,विद्यार्थी,जेष्ठ नागरिक,वाचक, हितचिंतक यांचीउपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!