कृषी

शेतकऱ्यांसाठी हा सुवर्ण काळ नाही तर विषकाळ आहे.-खा.रजनीताई पाटील

केज/प्रतिनिधी

अन्नदाता शेतकरी कायम उपेक्षित राहिला आहे. सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी देशात शेतकऱ्यांसाठी सुवर्णकाळ नाही तर विष काळ आहे.मराठवाड्या तील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतनाचा विषय आहे. कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतनाचा विषय आहे.ओला दुष्काळ,अतिवृष्टी, नापिकी या दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे.

यामुळे मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.बँकांचे कर्ज फेडणे यामुळे तो हतबल होत आहे.या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येला कवटाळावे लागत आहे.हीचिंताजनक बाब आहे.कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवुन उद्योजक देश सोडून पळून जातात पण शेतकऱ्यांचा मात्र बँका छळ करत आहेत. शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत करावी अशा शब्दात खा. रजनीताई पाटील यांनी राज्यसभेत सरकारवर निशाणा साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!