
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी प्राप्त झालेल्या बिनतारी संदेशानुसार,माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक २८ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत तीनदिवसांचा राज्य दुखवटा पाळण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार ज्या ठिकाणी दररोज नियमित पणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो,त्या सर्व ठिकाणी सदर कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर (अर्ध्यावर) फडकविण्यात यावा,असे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील राज्य शासनाची सर्व कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत कोणतेही शासकीय करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करू नयेत,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



