
केज/प्रतिनिधी
केज शहरातील स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संचलित,राजर्षी शाहू विद्या मंदिर केज शाळे मध्ये महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीचा विचार पुढील पिढीमध्ये प्रवाहीत राहावा यासाठी शाळेमध्ये बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले.यावेळी मंचावर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी,बाल सभेची अध्यक्षा कु. अंकिता चौरे,शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.यादव व्हि.बी,श्रीमती अनिता जाधव,श्रीमती ध्वजा गायकवाड यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले. अभिवादन कार्यक्रमा दरम्यान शाळेतील विद्यार्थिनी कु.प्राची शिंदे, वैष्णवी मिसाळ,अन्विता तपसे,आयुषा गायकवाड, सांची बनसोडे,गुंजन राऊत,प्रीतम चौरे,श्रद्धा लांडगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या व भविष्यामध्ये महामानवांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मार्गक्रमण करण्याचा निर्धार केला यावेळी शाळेतील शिक्षिका श्रीमती ध्वजा गायकवाड,श्रीमती अनिता जाधव व शिक्षक श्री.जयपाल मस्के यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रेरक गोष्टी सांगितल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या सभेच्या नियोजनासाठी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.महापुरुषांच्या विचारांवर आपण नेहमी चालले पाहिजे, महामानवांची पुस्तके वाचा असा यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. बाल सभेची अध्यक्षा कु.अंकिता चौरे हिने पण बाबासाहेबांना अभिवादन करून मनोगत व्यक्त केले.कु.सानिका अंकुशे, योगिता मुसळे,त्रिशा काळे,राजनंदिनी जाधव, अर्पिता नन्नवरे,संचिता रोडे,आर्या घुले यांचाही बालसभेच्या नियोजनात सहभाग होता. कार्यक्रमाचे संचलन चि.समर्थ देशमुख व कु.प्रितम फुंदे यांनी केले तर आभार चि. सार्थक बचुटे याने मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक श्री.क्षीरसागर आर.एस,श्री.डीरंगे जी. बी.यांचीही उपस्थिती लाभली.



