सामाजिक

कै.अजित दादा पवार यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून देगलुरच्या सामाजिक कार्यकर्त्याची तिरुमला चरणी प्रार्थना

देगलुर/प्रतिनिधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कै.अजित दादा पवार यांच्या आत्म्यास शांती लाभावी, या भावनेतून देगलुर येथील सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी आंध्रप्रदेशातील तिरुपती तिरुमला बालाजी येथे श्रद्धांजली अर्पण केली.सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी तिरुमला येथे सुमारे ३५५० पायऱ्या (अंदाजे १२ किलोमीटर अंतर) अवघ्या पाच तासांत पायी चढून भगवान तिरुपती तिरुमला बालाजी यांच्या चरणी नतमस्तक होत कै. अजित दादा पवार यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली.

या पायी यात्रेद्वारे त्यांनी श्रद्धा,समर्पण आणि सामाजिक जाणीव यांचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या भावनिक व श्रद्धापूर्ण उपक्रमाबद्दल देगलुर परिसरातून कौतुक व्यक्त करण्यात येत असून अनेकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!