राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्जाची मर्यादा वाढवली आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 1,45000 हजार रुपये पीक कर्ज मिळणार – प्रा.बबनराव आंधळे

बीड/ प्रतिनिधी
राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याच्या रकमेत वाढ केलेली आहे प्रति हेक्टरी 35000 रुपयांनी राष्ट्रीयकृत बँकांनी मर्यादा वाढवलेली आहे म्हणजे आता 145000 रुपये दिले जाणार आहेत.त्याच बरोबर दोन लाखापेक्षा अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सर्च रिपोर्टची अट ठेवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.जिल्ह्यात शेतकऱ्यांना 3000 कोटी पर्यंत पिक कर्ज वाटप सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून केले जाते.
नाबार्डच्या निकषा नुसार या वित्तीय संस्था शेतकऱ्यांना कर्ज वाटप करतात पीक कोणते आहे त्यावर पीक कर्जाची मर्यादा नाबार्डने निश्चित करून दिली आहे.त्या नुसारच वाटप करणे बँकांना बंधनकारक केलेले आहे.मात्र अलीकडे रासायनिक खते,पाणीपट्टी,वीज बिले, मजुरी,मशागतीच्या वाढलेल्या खर्चामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे शेतीमालाचा वाढलेला उत्पादन खर्च पाहून नाबार्डने पीक कर्जामध्ये वाढ केलेली आहे.यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जाची मर्यादा वाढवली होती पण राष्ट्रीयकृत बँकां शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख दहा हजार रुपये देत होत्या यामध्ये वाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती.त्या नुसार या बँकांनीही एक लाख पंचेचाळीस हजार रुपये मर्यादा वाढवली आहे.त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा बँकेने ते एक ते दीड लाख रुपये केले जिल्हा बँक उसाच्या लागण पिकासाठी गुंठ्याला दीड हजार रुपये म्हणजेच हेक्टरी दीड लाख रुपये पीक कर्ज देते त्याचबरोबर उसाच्या खोडवा पिकासाठी गुंठ्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये दिले जातात सोने तारणाला सिबिल सक्ती काॽ कर्जदाराचे शिबिल तपासल्या शिवाय कोणतीच वित्तीय संस्था कर्ज देत नाही कर्जदाराची परतफेडची क्षमता पाहण्यासाठी हे योग्य असले तरी आता सोने तारण कर्जासाठी सिबिल तपासले जात आहे.
सोने तारण हे सर्वात सुरक्षित कर्ज असताना सिबिलची सक्ती का असा प्रश्न इतर ग्राहकांमधून विचाराला जात आहे तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या राष्ट्रीयकृत बँकांनी वाढवलेल्या पीक कर्जाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्रा. बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



