
बीड/प्रतिनिधी
मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस ,उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे ,उप मुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वी रित्या राबवली जात आहे.
याबाबत दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी इ केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या.परंतु,गेल्या काही दिवसांत राज्यात आलेल्या नैसर्गिकआपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र भगिनींना इकेवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही,याची पूर्ण कल्पना आहे.या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आता दि.३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे.
त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई केवायसी करावी व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा.न्यायालयाचा आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी.या निर्णया मुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे.ज्या भगिनींनी अद्याप इ केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही,त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.



