भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालय मांग वडगाव येथे १७ वर्षानंतर भरली वर्गमित्रांची शाळा जुन्या आठवणींना दिला उजाळा

केज/प्रतिनिधी
भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालय मांगवडगाव ता.केज या शाळेतील सन २००८च्या इयत्ता दहावी वर्गात शिक्षण घेतलेल्या तब्बल २४ वर्ग मित्रांनी एकत्र येत स्नेह मिलन कार्यक्रम अतिशय थाटामाटात साजरा केला.यावेळी २००८ मध्ये शिक्षण घेऊन लष्करात अधिकारी पदावर असलेले,शिक्षक म्हणून कार्यरत असलेले, उद्योग व्यवसायात नाव लौकिक मिळवलेले, आधुनिक शेती करणारे, समाजसेवा करणारे, राजकारणात ठसा उमटवणारे, फॅशन डिझायनर,आदर्श गृहिणी व वेगवेगळ्या स्तरातून आपली जबाबदारी पार पाडणारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.तब्बल १७ वर्षानंतर भेटून देखील पूर्वीप्रमाणेच हर्षोल्लासातून पुन्हा तीच शाळा भरवली.
कार्यक्रमा च्या सुरुवात अगदी सकाळी शाळा भरण्याच्या वेळेपासूनच करण्यात आली होती.सकाळी शाळेच्या दोन घंटा वाजल्यानंतर सर्वांनी आपापल्या रांगा तयार करून घेतल्या.यावेळी माजी मुख्याध्यापक श्री. संपत गोरे सर यांनी पूर्वीच्याच पद्धतीने परिपाठाची ऑर्डर देताच सर्वांनी सावधान होत राष्ट्रगीत गायले व प्रतिज्ञा म्हटली.यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्पाने वर्गात जाते वेळी स्वागत करण्यात आले.
यानंतर सुरू झाला २००८ च्या इयत्ता दहावीचा वर्ग. सर्वांनी आपला परिचय देऊन वर्गातील शाळेतील जुन्याआठवणींना उजाळा देत शाळेने,शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळेच आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत असल्याच्या भावना व्यक्त केल्या शालेय जीवनात शिक्षकांनी वेळोवेळी केलेलेमार्गदर्शन आज समाजात वावरताना पदोपदी मोलाचे ठरत असल्याने आमच्या गुरुजींनी आम्हाला जे जे ज्ञान देता येईल तेनक्कीच दिले.याच ज्ञानाची शिदोरी घेऊन आम्ही समाजात आदर्श नागरिक म्हणून जगत असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले माजी मुख्याध्यापक श्री. संपत गोरे सर,सौ.वंदना डोंगरे-चाळक मॅडम,श्री. श्रीराम दांगट सर,श्री. रंजितकुमार वाघमारे सर, कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले श्री.माले सर जोधाप्रसाद उच्च माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई व शाळेतील सेवक विजयकुमार इंगळे यांचा शाल,पुष्पहार तसेच पेन व भेटवस्तू देऊन ह्रदय सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.संपत गोरे सर,सौ.वंदना डोंगरे मॅडम,श्री.श्रीराम दांगट सर व रंजितकुमार वाघमारे सर यांनी विद्यार्थ्यांच्या शाळेतील व वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.प्रमुख वक्ते श्री.माले सर यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करून असेच समाजात नाव लौकिक मिळवा अशा सदिच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रमानंतरविद्यार्थ्यांनी शाळेत घेतले जात असलेले पारंपारिक खेळ खेळून आजही आपल्यात खिलाडू वृत्ती जिवंत असल्याचे दाखवून दिले. विद्यार्थ्यांनी विविध गीत गाऊन,कथा सांगून व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांचे मनोरंजन केले.
एकमेकांशी हितगुज केले व शाळेतील आनंद घेण्याचा अनुभव सर्वांनी घेतला. शाळा, शाळेतील सर्व गुरुजन व वर्गातील सर्व मित्र मैत्रीण कितीही मोठे झालो तरी कोणालाच विसरणार नाही अशा भावना व्यक्त करून पुन्हा जुन्या आठवणींनी सर्वांचे डोळे पाणावले होते.पुन्हा असेच वेळात वेळ काढून सर्व वर्गमित्र एकत्र भेटत जाऊ, एकत्र राहू असा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या माजी विद्यार्थीनी असलेल्या व नुकतेच परभणी येथे सहशिक्षिका म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या सौ.दिपाली आबासाहेब जाधव यांचा यथोचित सत्कारकरण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर गोरे यांनी,सुत्रसंचलन दिपक साळुंके यांनी व आभार प्रदर्शन बब्रुवान इंगळे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता कळंब येथील हॉटेल तारा येथे स्नेह भोजनाने करण्यात आली.बब्रुवान बबलू इंगळे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळेच हा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.
कार्यक्रमास सन २००८ इयत्ता दहावी बॅच मधील माजी विद्यार्थी परमेश्वर गोरे,बब्रुवान इंगळे,सुधाकर इंगळे, सुनील जगताप,अजित जाधव,दिपक साळुंके, दत्ता मुळीक,बालाजी भोगल,पद्माकर राऊत, ऋषिकेश पाटील,रणजीत थोरात,सौ.सोनाली काळे, सोनाली पुरी,सोनाली तोडकर,सुनीता फरके, वसुधा इंगळे, अनुराधा भांगे,रेश्मा मस्के,अश्विनी शिंदे,अश्विनी इंगळे, शुभांगी पांचाळ,अनुराधा इंगळे,वंदना इंगळे यांची उपस्थिती होती.यावेळी सन २००८इयत्ता दहावी तील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन माऊली बालसदन मांगवडगाव येथे शिक्षण घेतअसलेल्या गरीब होतकरू मुलांना वाटपासाठी आणलेले शैक्षणिक साहित्य शाळे तील चित्रकला शिक्षक श्री.रंजितकुमार वाघमारे सर यांचेकडे सुपूर्द केले.



