रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाचा आवादा कंपनीच्या विरोधात केज तहसीलवर धडकला मोर्चा,उपोषण स्थळी मरण पावलेल्या सुबाबाई गोपाळ भोसले यांना न्याय द्यावा -भगवंत अप्पा वायबसे मराठवाडा अध्यक्ष

केज/प्रतिनिधी
आवादा कंपनीच्या मनमानी व गुंडप्रवृत्ती च्या कारभारामुळे केज तहसील कार्यालया समोर उपोषण करत असलेल्या सुबाबाई गोपाळ भोसले यांची उपोषण स्थळावर तब्येत खालावली होती त्यांना दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते, महिलेच्या मृत्यूशी कारणीभूत असलेले संबंधित आवादा कंपनीचे अधिकारी यांच्या विरोधात दि.१२ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर)या पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीयनेते दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठवाडा अध्यक्ष भगवंत आप्पा वायबसे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १२ वाजता केज येथील भवानी चौकातून तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,आवादा कंपनी च्या मनमानी आणि गुंड प्रवृत्तीच्या छळाला कंटाळून दि.24 जुलै 2025 रोजी केज तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण करत असलेले भोसले,तेलंग, थोरात,आदी लोक उपोषण करत होते.
दि.25 रोजी त्यांना सौ. सुबाबाई गोपाळभोसले या भेटण्यासाठी आल्या होत्या,आपल्या कुटुंबा वर होत असलेला अन्याय अत्याचार पाहून त्यांची तब्येत अचानक खालावली होती. त्यांना केज येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यामुळे आवादा कंपनीचे संबंधित अधिकारी सतीश कुमार शर्मा, सागर चंद्रकांत साबळे, संदीप खेत्रे,सुनील शिंदे, व गुत्तेदार अमोल पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळावा या मागणी साठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मराठवाडा अध्यक्ष भगवंत आप्पा वायबसे यांच्या उपस्थितीत आणि नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला.
या प्रसंगी तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांनी निवेदन स्वीकारले निवेदनातील मागण्या मध्ये आवादा कंपनीचे संबंधित अधिकारी सतीश कुमार शर्मा, सागर चंद्रकांत साबळे, संदीप कात्रे,सुनील शिंदे व गुत्तेदार अमोलपाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. पहिल्या सर्वे प्रमाणे लाईटचे काम मा. उपजिल्हा दंडाधिकारी साहेब आंबेजोगाई यांच्या पूर्ण परवानग्या घेऊनच करण्यात यावे. शेतकरी बांधवावर दाखल करण्यातआलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
पहिल्या सर्वे मध्ये छेडछाड करून गरीब बांधवावर दबाव तंत्राचा वापर करून चालू केलेले काम कायम स्वरूपी बंद करण्यात या चार मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावरील केलेल्या मागण्या १५ दिवसाच्या आत प्रशासनाने मान्य नाही केल्या तरयेणाऱ्या काळात संविधानिक पद्धतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे मराठवाडा अध्यक्ष भगवंत आप्पा वायबसे यांनी प्रशासनाला दिला आहे.
या मोर्चा प्रसंगी मराठवाडा अध्यक्ष भगवंत अप्पा वायबसे, मराठवाडा प्रवक्ता ज्ञानेश्वर गिरी,मराठवाडा संपर्क प्रमुख सौ.आम्रपाली गजेशीव, बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जाधव,केज तालुका अध्यक्ष आश्रुबा खरात, तालुका प्रवक्ता ज्ञानेश्वर गोरे,नवनाथ सोनवणे, शिल्पा बचूटे,किरण कसबे,बुद्धीराज आरकडे,पीडित कुटुंब आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.



