सामाजिक
महाराष्ट्र राज्यात १२ दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय होणार ; २३ जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

मुंबई/प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे.तळकोकणात ६ जून रोजी मान्सूनचे आगमन झाल्यानंतर त्याची प्रगती मंदावली होती.दक्षिण महाराष्ट्र आणि राज्यातील इतर अनेक भागांमध्ये गेल्या सुमारे १२ दिवसांपासून मान्सून रेंगाळलेला होता. मात्र आता वातावरणा तील अनुकूल बदलांमुळे मोसमी वाऱ्यांना पुन्हा वेग मिळण्याची चिन्हे दिसत असून २३ जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.



