
केज/प्रतिनिधी
सुकळी शिवारातील तलाठी सज्जा गोटेगाव येथील दशरथ विश्वनाथ गिरी यांच्या सर्वे नं. ९/२ मधील सोयाबीन पिकांना अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे.सलग पडणाऱ्या पावसामुळे पिके पाण्याखाली बुडली असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या शेतातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी विकास हजारे आणि तलाठी खतीब यांनी स्थानिक शिवाराची प्रत्यक्ष पाहणी केली.पंचनाम्या दरम्यान पिकांच्या नुकसानाचे अचूक मोजमाप करून नोंदवले गेले. शिवार सुकळी असूनही पिकांच्या पाण्यामुळे सोयाबीनची उभारणी पूर्णतः नष्ट झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले.
शेतकऱ्यांनी या पंचनाम्याद्वारे शासना कडे तातडीने आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.पंचनाम्याच्या आधारे भरपाईची प्रक्रिया सुरू होईल आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी आवश्यक ती मदत मिळेल ,अशी माहिती मंडळ अधिकारी यांनी दिली. शेतकऱ्यांनी सांगितले की ,अशा प्रकारच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान वारंवार होत असल्या मुळे शासनाने या भागासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे.



