शेतकरी जनहित कामगार मंच महाराष्ट्र भर दोन लाख झाडे लावण्याची मोहीम राबवणार,निसर्ग मित्र म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा.- जयवंतराव कांबळे

बीड/प्रतिनिधी
शेतकरी जनहित कामगार मंच गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या हिताचे व पर्यावरणाच्या रक्षणाचे काम करत असून दोन लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून त्या दृष्टीने काम सुरू असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रदीप गायकवाड यांनी सांगितले यावेळी पत्रकार पांडुरंग कसबे, श्रीपती सोळुंके,ज्ञानेश्वर जाधव,शिवाजी राठोड, अतिक सय्यद,राहुल रोकडे,इंद्रजीत डोंगरे यांनी सांगितले. याविषयी सविस्तर माहिती अशी की दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी किल्ले धारूर तालुक्यातील आडहिंगणी तांडा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरामध्ये मंचाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले.
येथील जिल्हा परिषदप्राथमिक शाळेचा परिसर दत्तक घेऊन येथील स्थानिक नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या तसेच शाळेतील शिक्षकांच्या मदतीने वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी विशेष भूमिका निभावली. येणाऱ्या काळामध्ये ही वृक्षारोपणाची मोहीम व्यापक केली जाणार असून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये दोन लाख झाडे लावण्याचे व त्यांचे सुव्यवस्थित संगोपन करण्याचे काम मंचाच्या माध्यमातून होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम राबवून निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्या साठी,त्याचप्रमाणे निसर्ग आपल्याला आदिअनंत काळापासून मानवाच्या गरजा भागवत आलेला आहे. परंतु सध्य परिस्थिती पाहता, निसर्गाचे संतुलन पाहता,अतिवृष्टी व निसर्गाचा विकोप पाहता,मानवाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाची केलेली हानी भरून काढण्यासाठी सदरील संघटना पुढे सरसावली आहे.
निसर्ग मित्र म्हणून प्रत्येकाने निसर्गासाठी आपले योगदान दिले पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळा मध्ये मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काना कोपऱ्यामध्ये वृक्षारोपण करण्याची मोहीम सदरील मंचच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेली असून यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा,असे शेतकरी जनहित कामगार मंचाचे संस्थापक अध्यक्ष श्री. जयवंत कांबळे साहेब यांनी आवाहन केले आहे.



